#80People & Blogs
Don't Forget to SUBSCIRBE to our YouTube Channel\n---- http://bit.ly/SUBSCRIBE-ViralInIndia ----\n---------------------------------------------------------------------------------\n■ आमचे नवीन व्हिडीओ पाहा - http://bit.ly/ViralIndiaVideos ■\n\n\nपुणे: मनसेला मत देणार नाही: नाना पाटेकर\n\nप्रत्येकाला बोलण्याचा, मत मांडण्याचा अधिकार आहे. राज ठाकरे यांनी त्यांचा आणि मी माझा मुद्दा मांडला. यात राज यांचे काहीही नुकसान झाले नाही. फक्त मनसेचे एक मत गेले, असे सांगून अभिनेते नाना पाटेकर यांनी यापुढे मनसेला मत देणार नसल्याचे संकेत दिले आहेत. ते आज पुण्यातील एनडीएच्या दीक्षांत सोहळ्यात बोलत होते.\n\nमुंबईसह ठिकठिकाणी मनसेने केलेल्या आंदोलनानंतर नाना पाटेकर यांनी फेरीवाल्यांची बाजू घेतली होती. फेरीवाल्यांच्या पोटावर पाय का देता, असा सवाल त्यांनी केला होता. त्यावर राज ठाकरेंनी नानांना खडेबोल सुनावले होते. माहिती नसताना नाना पाटेकरांनी चोमडेपणा करू नये, असे ते म्हणाले होते. राज यांच्या टीकेला नानांनी आज प्रत्युत्तर दिले आहे. 'प्रत्येकाला बोलण्याचा आणि आपापली मते मांडण्याचा अधिकार आहे. राज यांनी त्यांचा मुद्दा मांडला होता. मी माझा मुद्दा मांडला. यात राज यांचे काहीच नुकसान झाले नाही. मात्र मनसेचे एक मत गेले,' असे ते म्हणाले.\n\nकाय बोलले होते राज ठाकरे - \n'महात्मा नाना पाटेकर आज काहीतरी बोललेत ? नाना पाटेकर बोलताना 80 वर्षाच्या आजोबांचा एक टोन असतो', अशी टीका करताना राज ठाकरेंनी नाना पाटेकरांची नक्कलही करुन दाखवली. 'वेलकममध्ये भाजा विकत होता ना, त्यामुळे फेरीवाल्यांचा पुळका आहे', अशी उपहासात्मक टीका राज ठाकरे यांनी केली. 'नाना पाटेकर यांनी माहित नाही त्या गोष्टीमध्ये चोमडेपणा करणं बद करावं. नाना पाटेकर मराठीतला उत्तम कलावंत आहे, तुमचे चित्रपट बघू...पण नको त्या गोष्टीत पडू नका', असं राज ठाकरे म्हटले होते. \n\nराज ठाकरे यांनी नाना पाटेकर यांना नाम संस्था सुरु करण्यावरुन प्रश्न विचारले. 'महाराष्ट्रातील पाण्याचा प्रश्नही सरकारने सोडवायचा आहे, मग कशाला संस्था काढली. संस्था काढण्यापेक्षा सरकारकडे जायला पाहिजे होतं. जिथे सरकारला जमत नाही, तिथे पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतला ना मग आम्हाला शिकवायचं नाही', असं राज ठाकरेंनी सांगितलं होतं . \n\n'मराठी चित्रपटांना स्क्रिन मिळत नव्हती, तेव्हा नाना पाटेकर बोलल्याचं आठवत नाही', असा टोला राज ठाकरे यांनी लगावला. आम्ही तुझं अभिनंदन केलं पाहिजे तिथे संजय निरुपम कौतुक करतो असं सांगत राज ठाकरे यांनी खंत व्यक्त केली. यावेळी राज ठाकरेंनी दाक्षिणात्य नेते आणि अभिनेत्यांचं पुन्हा एकदा उदाहरण दिलं. पहा ते कसे एकत्र येतात. तुम्हाला यायचं नाही तर येऊ नका, पण चोमडेपणा कशाला करता. महाराष्ट्रात आमचंच कुंपण शेत खातय असा टोला राज ठाकरेंनी लगावला. \n\nWill not vote for MNS: Nana Patekar\n\nActor Nana Patekar answered today on the hollow criticism of MNS chief Raj Thackeray on the issue of re-provincial hawkers. Nana Patekar said that Raj Thackeray's personal loss is not a personal loss, but he has made a vote of MNS, saying that he will not vote for MNS in the next elections.\n Nana Patekar was present for the convocation of the NDA in Pune. At that time, after the program, he told reporters he gave his reaction. Taking the farewell side, he said, Raj Thackeray had raised his issue and I am my own. Everyone has the right to speak and talk. Raj Thackeray did not have a personal loss, but MNS had a vote. Everyone has the right to live. The hawkers should give them a place of entitlement.\nEveryone has the right to speak, to vote. Raj Thackeray gave him and I raised my issue. There was no loss of Raj in this. Nana Patekar has indicated that MNS will not vote for MNS. He was speaking at the NDA congress held in Pune today.\n\nNana Patekar had taken the side of the hawkers after the MNS protest movement at Mumbai. He questioned why the hawkers pawned on their stomach. Raj Thackeray had spoken to the Narsa. He had said that Nana Patekar should not do a perfect matchlessness while not having any information. Naan has responded to Raj's criticism today. 'Everyone has the right to speak and express their opinions. Raj had raised his issue. I raised my point. There was no loss of Raj in this. However, one vote of MNS went, he said.\n\nVIRAL IN INDIA MEDIA GROUP | TEAM VII | MARATHI CHANNEL